Narasimha Jayanti- नरसिंह जयंतीचे महत्त्व
नरसिंह जयंती ही भगवान विष्णूंच्या चौथ्या अवताराच्या जन्माचा उत्सव आहे. या दिवशी भगवान नरसिंह, यांना अर्धा सिंह आणि अर्धा मानव म्हणून ओळखले जाते. त्यांची पूजा केली जाते. या अवताराने हिरण्यकश्यपूचा वध केला, जो त्यांच्या भक्ताला प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी होता.
वैशाख शुद्ध चतुर्दशी या दिवशी श्री नरसिंह जयंती (Narasimha Jayanti) असते. ज्यांचे कुलदैवत श्री नरसिंह आहे ,ते लोक या दिवशी उपवास करून संध्याकाळी श्री नरसिंहाची पूजा करतात. काही लोकांच्या घरी वैशाख शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या काळात श्री नरसिंह नवरात्र असते. पौर्णिमेलाच त्याचे पारणे फिटते.

नरसिंह जयंतीचे महत्त्व.
वाईटावर चांगल्याचा विजय.
नरसिंह जयंती (Narasimha Jayanti) वाईटावर चांगल्याचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय याचं प्रतीक आहे.भक्तांना संरक्षण.असे मानले जाते की भगवान नरसिंहाची पूजा केल्याने भक्तांना संरक्षण, समृद्धी आणि आशीर्वाद मिळतो.
धर्मसंस्थापन.
भगवान विष्णूने नरसिंह अवतार धर्म स्थापित करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी घेतला होता
नरसिंह जयंती (Narasimha Jayanti) भगवान विष्णूंच्या चौथ्या अवताराच्या जन्माचा उत्सव आहे. या अवताराने हिरण्यकश्यपू या दैत्याचा वध केला, जो त्यांच्या भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी होता.

हिरण्यकश्यपूची तपश्चर्या व वर प्राप्ती.
हिरण्यकश्यपू महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी बसला, त्याची कठोर तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी हिरण्यकश्यपूला वर मागण्यास सांगितले. तेव्हा हिरण्यकश्यप म्हणाला ” प्रभू, मला अमरत्व प्राप्त होईल असा वर द्या ! ”
यावर असा वर देता येत नाही असे ब्रह्मदेव म्हणाले. कारण या जगात जो जन्मतो त्याला मरण आहे. हा सृष्टीचा नियम आहे. तेव्हा तू दुसरा वर माग असे ब्रह्मदेवाने सुचविले. तेव्हा हिरण्यकश्यपने दुसरा वर मागितला, तो असा होता,
” मला मनुष्य, देव, दैत्य किंवा प्राणी यापासून मरण येऊ नये. दिवसा, रात्री, घरात, घराबाहेर, शस्त्राने, अस्त्राने, पृथ्वीवर, पाताळात किंवा आकाशात मला मरण येऊ नये. ” हिरण्यकश्यपूने मोठ्या चातुर्याने हा वर मागितला आहे, हे ब्रम्हदेवाच्या लक्षात आले. परंतु त्यांनी त्याला तसा वर दिला.
भक्त प्रल्हाद.
हिरण्यकश्यपला ब्रह्मदेवाकडून वर मिळाल्याने तो उन्मत्त झाला. हिरण्यकश्यपने त्रैलोक्याला त्रास देण्यास सुरुवात केली. तो स्वतःला श्रेष्ठ मानून त्रैलोक्याचे स्वामी आपणच आहोत हे सांगू लागला. याच काळात त्याची पत्नी कयाधू प्रसूत झाली. तिच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला.
प्रल्हादाचे अनेक विद्वान आचार्यांकडे शिक्षण सुरू झाले. पण प्रल्हाद सदैव श्रीहरिचे भजन म्हणत असे व आनंदाने नाचत असे.
एकदा हिरण्यकश्यपने प्रल्हादाला विचारले ” बाळा तू गुरुगृही काय शिकलास ? ” तेव्हा प्रल्हादाने भगवान श्रीहरीचे महात्म्य वर्णन केले व भगवान विष्णू सर्व शक्तिमान, सर्व व्यापक कसे आहेत ते सांगितले.
हे ऐकताच हिरण्यकश्यपला प्रचंड राग आला. तो प्रल्हादावर ओरडला, तो म्हणाला ” खबरदार पुन्हा त्या नारायणाचे नाव घेशील तर !
तुला ठार मारून टाकीन ! “. पण प्रल्हाद मात्र शांत राहिला. त्याने शांतपणे नारायण, नारायण हा जप चालूच ठेवला.
हिरण्यकश्यपचा वध.
हिरण्यकश्यपने प्रल्हादाला ठार मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता, प्रत्येक वेळी प्रल्हाद सुखरूप राहत होता. कारण त्याच्यावर भगवान विष्णूंची कृपा होती.
एके दिवशी हिरण्यकश्यपने प्रल्हादाला एका खांबाला बांधले. हिरण्यकश्यपने आपल्या मुलाला दरडावून विचारले ” तुझा हरी कुठे आहे सांग ! ” आज तुझे रक्षण तो कसे करतो तेच पाहतो.
तेव्हा प्रल्हाद म्हणाला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे तो श्रीहरी भरून राहिला आहे. ” या खांबात आहे का ? ” असे हिरण्यकश्यपने विचारले. ” या खांबातही श्रीहरी आहे ” असे प्रल्हाद म्हणाला. हे ऐकून हिरण्यकश्यप अत्यंत क्रोधित झाला. त्याने त्या खांबाला जोरात लाथ मारली.
त्याच क्षणी कानठळ्या बसविणारा प्रचंड कडकडाट झाला. अत्यंत उग्र, भीतीदायक रूप धारण केलेले, भगवान नरसिंह त्या खांबातून प्रकट झाले. त्यांचे मुख सिंहाचे होते व बाकीचे शरीर माणसाचे होते.
नरसिंहाने हिरण्यकश्यपूला पकडून आपल्या मांडीवर घेतले व आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट फाडले. हिरण्यकश्यपू मृत्यू पावला. त्यावेळी सूर्य अर्धाच अस्ताला गेला होता. प्रल्हादाने नरसिंहाचे स्तवन केले. प्रल्हादाला नारायण भक्तीचा उपदेश करून भगवान नरसिंह अदृश्य झाले.
ही घटना वैशाख शुद्ध चतुर्दशी, सूर्यास्त होत असताना झाली. या दिवसाचे स्मरण म्हणून श्री नरसिंह जयंती (Narasimha Jayanti) साजरी केली जाते.
Other Articles- अक्षय्य तृतीया